Thursday, July 23, 2009

माझं किचन : प्रिया बेर्डे


आत्म्याशिवाय शरीराची कल्पना करता येत नाही, तसे स्वयंपाकघराशिवाय पूर्णार्थाने घर असूच शकत नाही. म्हणून स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा, ही माझी पूर्वीपासूनच धारणा आहे. माझ्या स्वयंपाकघरात केवळ घरातील मंडळींपुरता स्वयंपाक कधीच होत नाही. स्वयंपाकाची आणि रसना तृप्त करण्याची हौस ही मला बालपणापासूनच; पण मला स्वयंपाकघरात ताबा मिळाला तो तारुण्यात. जबाबदारी अंगावर पडल्यामुळे.

आज मी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवीत असले तरी मला पक्कं आठवतं, की माझी पहिली रेसिपी म्हणजे कांदेपोहे. ते मी नक्की कधी केले तेवढे आठवत नाही. आम्ही मूळचे कोल्हापूरचे. सण-सोहळे मोठ्या धुमधडाक्‍याने साजरं करणारं माझं माहेर. त्यामुळे नवरात्र, गणेशोत्सव असे सण घरी साजरे होत व तेवढ्याच जेवणावळीही उठत. अशा शुभप्रसंगी पुरणपोळ्या, तसेच उकडीच्या मोदकांपासून ते खिरीपर्यंत सारं गोडधोड घरीच केलेलं असायचं. नारळीभात, साखरभात, काजू-कतली यांच्यासोबत पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य आमच्या स्वयंपाकघरात असायचं.

मी लक्ष्मीकांतशी लग्न केलं. माझं सासर म्हणजे संयुक्त कुटुंब. २०-२५ माणसं गणेशोत्सव काळात आमच्या घरी असतात. या घरात मला स्वयंपाक करण्याचा मनमुराद आनंद लुटता आला. माझ्या जाऊबाई- म्हणजे रवींद्र बेर्डे यांच्या पत्नी सुगरण. लक्ष्मीकांतची पहिली पत्नी रुही हिच्या हातालाही कमालीची चव होती. या घरात मी मांसाहार करायला शिकले. माझ्या नणंदेकडून मी भंडारी पद्धतीचं जेवण शिकले. मग तो साधा जवळा असो किंवा मसाल्याची सुरमई असो, कोंबडी असो वा मटण असो, बिर्याणी असो वा गोव्याची मच्छीकरी असो... मला सारे पदार्थ चांगल्या प्रकारे करता येतात, असा इतरांचा अभिप्राय आहे. मला केवळ मांसाहारच आवडतो असं नाही; शाकाहारही मला तितकाच प्रिय. अगदी पिठलं-भातही मला आवडतो. शेपू, कारली, दुधी भोपळा, कडधान्यं, बटाट्याची भाजी, पालेभाजी- सारं मला प्रिय.

लक्ष्मीकांत तसा खवय्या होता. चमचमीत आणि मसालेदार मांसाहार त्याला भारी प्रिय असे. असा कुणी खाणारा असला की साहजिकच तसे पदार्थ करायलाही मजा येते. लक्ष्मीकांतला माझ्या हातची बटाट्याची भाजीही खूप आवडायची. चित्रपट क्षेत्रातील कितीतरी माणसं लक्ष्मीकांतसह माझ्या घरी खास जेवायला यायची. अशोक सराफ, सचिन, विनय, जॉनी लिव्हर, डी. रामा नायडू, सतीश शहा, विजय कदम असे कितीतरी जण अजूनही जेवणावळींची आठवण काढतात.

"सम्राटासारखं भोजन असावं, कोणत्याही प्रकारच्या कटकटीशिवाय प्रसन्नतेने आणि अन्न हे पूर्णब्रह्म मानून मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यावा,' ही माझी जेवणाविषयीची कल्पना. जेवण तयार करून ते वाढावं, हा स्वयंपाकाचा मूळ हेतू नाही. केलेल्या स्वयंपाकातील पदार्थांना ताटात जागच्या जागी स्थान देऊन, सजवून, चित्ताला प्रसन्नता येईल अशा प्रकारे ते वाढले जावेत आणि हे सारं करताना स्वच्छता पाळावी, हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. पाटा-वरंवटा, परात ही पूर्वीची साधनंही घरात आहेत आणि वापरातही आहेत.

जेवणाचं हे महत्त्व मी माझ्या चित्रीकरणाच्या घाईगर्दीच्या वेळापत्रकातही जपते. कोणताही चित्रपट स्वीकारताना माझी पहिली अट असते ती साऱ्यांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे. या साऱ्यांत कलाकार असतात तसे स्पॉटबॉयही असतात. त्यात अजादुजा भाव नाही. जेवण पंचतारांकित हवं, असा त्याचा अर्थ नसतो, तर जे असेल ते चांगलं असावं, एवढंच. आमच्या प्रॉडक्‍शनच्या वेळी मी स्वतः घरून जवळपास ४०-५० जणांचं जेवण घेऊन जात असे. अजूनही चित्रीकरणाला जाताना मी घरचाच डबा घेऊन जाते. घराबाहेरचं जेवण सहसा पोटात जात नाहीच. आताही जेव्हा माझी मुलं घरी येतात, तेव्हा मी दोन-तीन दिवस घरातच मुलांसोबत असते. त्या वेळी कोणत्याही कामापेक्षा मुलांचं सान्निध्य माझ्या लेखी महत्त्वाचं असतं. या दोन-तीन दिवसांत मी मुलांना जे जे काही खायचं असेल ते ते करून देते. त्या वेळी वरण-भातापासून ते चायनीजपर्यंत सारं काही माझ्या स्वयंपाकघरात शिजत असतं.

माझी आवडती बटाट्याची भाजी

नोकरीवर जाणाऱ्या गृहिणींना घाईघाईत आणि गडबडीत स्वयंपाक करून घड्याळाच्या काट्याबरहुकूम रेल्वे पकडणं शक्‍य नसतं. अशा वेळी पटकन होणारी, स्वादिष्ट व पौष्टिकही असणारी भाजी मी आज मैत्रिणींना सांगणार आहे. ही डिश मला खूप आवडते.

साहित्य ः उकडलेले चार-पाच बटाटे, चार कांदे, १५ ते २० लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, तीन-चार टोमॅटो, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, तिखट.

कृती ः हिंग, जिरे, मोहरी यांची तेलात फोडणी घालावी. यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त तेल वापरावं. लसूण आणि आल्याची पेस्ट करू नये, तर ते वाटून घ्यावेत. (म्हणजे हे पदार्थ दाताखाली यायला हवेत.) हे मिश्रण मिसळून त्यात त्यानंतर हळद टाकून त्यात कांदा परतून घ्यावा. हळद टाकल्यावर कांदा व्यवस्थित भाजला जातो. त्यानंतर चिरलेले टोमॅटो व तिखट टाकावं. भांड्यातील हे पदार्थ व्यवस्थित फिरवून घेतल्यावर त्यात बटाटे टाकावेत व पुन्हा परतून घ्यावेत. त्यानंतर झाकण टाकून पाचेक मिनिटं वाफेवर शिजवावेत. ही डिश एकदा तरी करून पाहाच.

प्रिया बेर्डे

सौज्यन्य : ई-सकाळ





Tuesday, July 21, 2009

स्वतःच स्वतःला चार्ज करू या


आपल्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची आणि आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कामाच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे, त्यात बदल करत राहणे यातून आपण स्वतः मनाने ताजेतवाने राहण्यास मदत होते.

""सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!'' विंदा करंदीकरांच्या एका प्रसिद्ध कवितेची सुरवात. नोकरी असो वा व्यवसाय- रोज उठून ऑफिसला जायचे, रोज तेच तेच काम करायचे, घरीही रुटीननुसार तेच काम करत राहायचे... खरंच कंटाळा येतो ना कधी कधी या सगळ्याचा? "मी का एवढी धावपळ करतोय/ करतेय?', "कशाला मी एवढा त्रास करून घ्यायचा?' असे प्रश्‍नही खूपदा आपणच आपल्या मनाशी विचारत असतो. खरे तर हा प्रश्‍न मनात डोकावू लागला की नक्की समजायचे, की आपली बॅटरी डाऊन झालीय. तिला चार्ज करायची नितांत गरज आहे. आपल्यापैकी काही जण म्हणतील, असा कंटाळा आला की आम्ही कामातून चार दिवस सुटी घेऊन कुठेतरी लांब फिरून येतो. पण नीट पाहिले तर सुटीवर जायच्या आधी रजा घ्यायची म्हणून काम संपविण्याची घाई, जेथे गेलेलो असतो तेथे वेगवेगळी ठिकाणे पाहणे, खरेदी करणे, प्रवासाची धावपळ व पुन्हा परत आल्यावर कामाचे साठलेले डोंगर वाट पाहत असतात. मजा करणे, आराम करणे हे सगळे या घाईगडबडीत राहूनच जाते. अर्थात प्रश्‍न तसाच आहे, की आपण आपली बॅटरी चार्ज कशी करायची? नेहमीच कार्यक्षम व उत्साही कसे राहायचे? त्यासाठी लक्षात घेऊ व चढू या या तीन पायऱ्या.

सर्वात पहिली पायरी म्हणजे कोणतेही काम करताना स्वतःच स्वतःला विचारायचे, की "आपण हे काम का करीत आहोत?'

हे काम खरेच आपल्याला आवडते, की केवळ पैसा व पदाचा विचार करून आपण करत आहोत, हे ठरवायला हवं. आपण करत असलेल्या कामातून आपल्याला आनंद व समाधान मिळत नसेल व केवळ गलेलठ्ठ पगारासाठी आपण काम करीत असू, तर बॅटरी सारखी सारखी डाऊन होणार हे नक्की! अर्थात नेहमी आपल्या आवडीची कामे आपल्याला करायला मिळतात, असे नाही. जी कामे आवडत नाहीत तीसुद्धा आपल्याला नाइलाजाने का होईना, पूर्ण करावी लागतात. तेव्हा कोणतेही काम असो, ते मी आनंदाने व पूर्ण क्षमतेने पार पाडणार, असा विश्‍वास आपण स्वतःला द्यायला शिकले पाहिजे. आजकाल सर्वत्र इन्स्टंटचा जमाना असल्यामुळे सगळे काही आपल्याला झटपट हवे असते. पण कामातील आनंद घ्यायचा असेल, आपली ऊर्जा टिकवायची असेल तर सोपा व तात्पुरता मार्ग उपयुक्त ठरत नाही. समजा आपल्या अंगणात खूप गवत वाढलेले आहे. ते गवत काढण्याचे दोन मार्ग आहेत- एक सोपा व दुसरा कठीण.

सोपा मार्ग म्हणजे गवत काढण्याचे यंत्र फिरवायचे. यामुळे काही दिवस अंगण अगदी स्वच्छ दिसते, पण लवकरच जोमाने गवत पुन्हा उगवते. दुसरा थोडा कठीण मार्ग म्हणजे खुरपे घेऊन, गुडघ्यावर बसून मुळापासून गवत उपटून काढायचे. हे करायला वेळ लागतो, थोडे कष्ट पडतात; पण गवत पुन्हा लवकर उगवत नाही. हा दुसरा मार्ग थोडा कष्टप्रद व अवघड असला तरी काम मुळापासून पूर्ण झाल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो व हा आनंद बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो.

स्वतःला चार्ज करण्यासाठीची दुसरी पायरी म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे, टिकविणे व वाढविणे. आपल्याला आयुष्यात जे मिळालेय त्याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढायला हवा. बऱ्याच वेळा जे आपल्याकडे नाही त्या बाबतीत तक्रार करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्यातील सकारात्मकता वाढविण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची व आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कारण काम करून होणाऱ्या श्रमांमुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त थकवा काम टाळण्याच्या सवयीमुळे येतो. बऱ्याच वेळा एखादे काम पूर्ण झाले नाही किंवा अपयश आले की एखादी गळकी टाकी जशी हळूहळू रिकामी होते, तशीच आपली काम करण्याची ऊर्जा कमी होत जाते. अपयश म्हणजे काय, तर आपण करीत असलेल्या कामाचा अपेक्षित परिणाम न मिळणे. अपयश टाळण्यासाठी व यश मिळविण्यासाठी आपण जे मनात आणतो, त्यावर विश्‍वास ठेवला तर ते काम पूर्णपणे पार पाडू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. कारण कोणत्याही कामाचे यश हे आपल्या विचारात, कृतीत व वृत्तीत असते. आपल्याला चार्ज करण्यासाठीची तिसरी पायरी म्हणजे आपल्याला काम करण्याच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे.

काम करीत असताना त्यात काही चांगले बदल करत राहण्याची वृत्ती निर्माण करायला हवी, त्याबरोबरच आपल्या स्वतःच्या मनाला रोज निवांतपणे भेटले पाहिजे। तोचतोचपणा आपल्या कामाला आणि आयुष्याला साचलेपणा आणतो, त्यामुळे रोजच्या कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा. उदा.- ऑफिससाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करून बघा; नेहमीच्या रस्त्याऐवजी एखाद्या दिवशी दुसऱ्या रस्त्याने ऑफिसला जा, इत्यादी. थोडे वेगळे जगून बघितल्याने आपल्या कामाला प्रवाहीपणा येतो. कामाचा सुंदर प्रवाह आपल्यातील उत्साह वाढवितो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही काम करताना कुठे आणि केव्हा थांबायचे, हे आपल्याला अचूक माहिती असेल तर आपण नेहमीच चार्ज्ड राहतो. चला तर मग! काम करण्याची ऊर्जा वाढविणे आणि टिकविणे यासाठी आपला योग्य व समतोल आहार, व्यायाम व विश्रांती यांची तजवीज करू या व ही ऊर्जा वापरायची पुरेपूर स्पष्टतासुद्धा आपल्यामध्ये वाढवू या.

सौज्यन्य :ई-सकाळ

आयुष्यावर बोलू काही


वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा.

आपणा सर्वांना एका हावरट आणि श्रीमंत शेतकऱ्याची गोष्ट माहिती आहे ती अशी - या शेतकऱ्याला राजाकडून असं एक वचन मिळालं, की तो एका दिवसात जेवढं अंतर चालेल तेवढी जमीन त्याला बक्षीस दिली जाईल. त्यासाठी अट अशी होती, की चालायला तो जिथून सुरवात करेल त्या ठिकाणी त्यानं सूर्यास्तापर्यंत पोचायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी या श्रीमंत शेतकऱ्यानं वेगानं चालायला सुरवात केली; कारण त्याला जास्तीत जास्त जमीन मिळवायची होती. दुपारी तो बराच दमला होता, तरी चालतच राहिला; कारण भरपूर श्रीमंत व्हायची आयुष्यातली ही अपूर्व संधी त्याला गमवायची नव्हती.

दुपार सरल्यावर राजानं घातलेली अट एकदम त्याच्या लक्षात आली. जिथून सुरवात केली तिथं त्याला सूर्यास्तापूर्वी परत पोचायचं होतं. जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरू केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं.

सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक वेगानं परतू लागला. आपण अकारण फार दूर चाललो हे त्याच्या लक्षात आलं, वेग अधिक वाढवणं प्राप्तच होतं. तो पूर्णपणे थकला होता. त्याला श्‍वासही घेणं खूप अवघड जात होतं, तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळतच होता आणि अतिशय कष्टानं तो कसाबसा सकाळी निघालेल्या जागी येऊनही पोचला; परंतु अति श्रमामुळे तो धाडकन जमिनीवर कोसळला. तो काही परत उठू शकला नाही. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागेवर तर पोचला त्यामुळे राजानं सर्व जमीन त्याला दिलीही; पण त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. शेवटी त्याला तेथेच पुरण्यात आलं. त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हातांची जागा पुरली.

या गोष्टीत एक मोठं सत्य दडलेलं आहे. तो शेतकरी श्रीमंत होता की नाही हे महत्त्वाचं नाही. अति हव्यासानं, लोभामुळे भारलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट हा याच पद्धतीनं होतो हे मात्र विदारक सत्य आहे.

ही गोष्ट म्हणजेच आपल्या आजच्या जीवनाचं प्रवासवर्णनच नाही का? मती गुंग करणारी गती आपल्या आयुष्याला आली आहे. प्रत्येक जण वेगानं, अधिक वेगानं नुसता धावतो आहे.

आपण दिवसामागून दिवस पैसा, अधिकार आणि मान्यता मिळविण्यासाठी जिवाच्या आकांतानं धावतच राहतो ना? असं करीत असताना आपण आपले आरोग्य, स्वास्थ, कुटुंब, आपले छंद, आतला आवाज आणि आपल्या सभोवतालच्या अनेक सुंदर-सुंदर गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असतो. प्रथम संपत्ती, अधिकार आणि आणि मान्यता मिळविण्यासाठी आपण आपलं आरोग्य खर्चून बसतो आणि नंतर आरोग्य परत मिळविण्यासाठी आपल्याला मिळवलेली सर्व संपत्ती खर्चावी लागते. मग एक दिवस आपल्या लक्षात येतं की हे सर्व मी का केलं?

खरंच पैशाची आपल्याला किती गरज असते? पण, हे लक्षात येतं तेव्हा मात्र आपण काळ मागं नेऊ शकत नाही आणि गमावलेल्या गोष्टीही आपण परत मिळवू शकत नाही. समोर असलेली शिडी तर आपण दमछाक करून बरीच वरती चढून आलेलो असतो; परंतु वर आल्यावर आपल्या लक्षात येतं, की ही शिडीच आपण चुकीच्या भिंतीवर लावलेली असते. आयुष्य म्हणजे नुसता पैसा, नुसती सत्ता, नुसता अधिकार मिळवणं नाही! आयुष्य म्हणजे नुसते काबाडकष्ट करणंही नाही. आयुष्य जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे हे खरं; पण किती? पैसा साधन आहे; परंतु साध्य मात्र नक्कीच नाही.

वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. आपल्या आयुष्यात हा समतोल कसा आणायचा हे आपल्यालाच ठरवावं लागतं. आपला प्राधान्यक्रम ठरवा. आयुष्य ही एक तडजोड आहे हे लक्षात ठेवा; पण असे निर्णय घेताना आपलं अंतर्मन काय सांगतं याकडे लक्ष द्या. त्याच्याकडे काणाडोळा तर नक्कीच व्हायला नको. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा. काम करताना निसर्गाचा आनंदही मनमुराद लुटा. अवतीभोवतीच्या मंडळीच्या भाव, भावनाही जोपासा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. ते छोटं आहे, थोरही आहे. आयुष्य गृहीत धरता येत नाही. आयुष्यातील समतोल साधा आणि उशीर होण्यापूर्वीच आयुष्य पूर्ण अर्थानं जगा!

सौजन्य: ई-सकाळ




Friday, July 17, 2009

माझं किचन - डॉ. निशिगंधा वाड


तसे पाहिले तर माझे लग्न होईपर्यंत माहेरी माझ्या वाटेला स्वयंपाकघरातील कोणतेही कामच येत नसे. कुटुंबात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या. त्यात मी घरात शेंडेफळ असल्यामुळे लाडाकोडात वाढलेली; पण काम अंगावर पडल्यावर शिकावेच लागते. तोच अनुभव माझाही.
लग्नानंतर वेगळा संसार थाटल्यावर प्रत्येकीला स्वयंपाकात स्वयंसिद्ध व्हावे लागते, त्याच प्रक्रियेतून मी गेले. मला तशी स्वयंपाक करायची आवड नव्हती; पण गरजेपोटी सर्वकाही करावे लागते. अर्थात गरजेपोटी करायचे असले, तरी ते केवळ करायचे म्हणून करायचे नाही, हे माझे तत्त्व. तीच शिस्त माझ्या स्वयंपाकात आणि स्वयंपाकघरात आहे. कुटुंबीयांना चारी ठाव चांगले करून देणे, अन्न मोजकेच असले तरी ते पौष्टिक असावे, त्यातील सकसता कशी वाढवता येईल याला प्राधान्य द्यावे, अशाच मताची मी आहे. म्हणून स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नाची सकसता यांना मी नेहमीच अधिक महत्त्व देत आले आहे.

पाककृती आणि पाककला या दोन भिन्न बाबी आहेत. पाककृती या प्रयत्नांनी जमू शकतात; पण पाककलेसाठी जी रसिकउडी घ्यावी लागते, ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. पाककला हीदेखील इतर कलांसारखीच एक कला आहे. मी जेव्हा स्वयंपाक करायला शिकले, तेव्हा ते कुणा एकाकडूनच शिकले असे नाही, व्यक्ती, अनुभव, गरज, पुस्तके आणि नियतकालिके, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून मी शिकत गेले. काही गोष्टी आजीच्या पाहून शिकले, तर लग्न झाल्यावर चिकनचे पदार्थ नवऱ्याकडूनही शिकले. स्वयंसिद्ध होणे महत्त्वाचे आहे. मग ती स्वयंसिद्धता आपल्या स्वयंपाकघरात का नसावी? मॉड्युलर किचन घेणे आता अनेकांना परवडण्यासारखे असते. मायक्रोवेव्ह अनेकांच्या घरात असतो. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा पूर्णतः विसर पडला आहे, असे मलातरी वाटत नाही आणि जाणवत नाही. म्हणून ज्या अन्नावर आपले पालनपोषण होते, ते अन्न अधिकाधिक चांगल्या तऱ्हेने कसे सिद्ध करता येईल, यासाठी प्रत्येक गृहिणीने दक्ष राहिले पाहिजे. ही दक्षता मी घेत असते. म्हणून माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी इतर व्यक्ती असल्या तरी माझ्या स्वयंपाकघरावर अधिराज्य माझेच असते. स्वयंपाकघरात काय हवे, किती हवे, कसे हवे, कधी हवे, याचा निर्णय मीच घेते.
स्वयंपाकघर हे माझ्यासाठी दुसरे देवघरच असते; नव्हे, माझे देवघरच स्वयंपाकघरात आहे. त्यामुळे तेथला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता याला मी प्राधान्य देत आले आहे. देवाची भक्ती जशी मनाची मशागत करते, तशी शरीराची मशागत अन्नातून होत असते. हे अन्न थेट पोटात जात असते. त्यामुळे त्याच्या बाबतीत कटाक्ष हा असलाच पाहिजे. माझ्या मुलीला जंक फूडची मी कधीच सवय लावली नाही. आता तिलाच असे बाहेरचे खाद्यपदार्थ आवडत नाहीत. माझ्या सुदैवाने मला योग्य वेळी आहारासंबंधीची खूप चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळाली. गर्भावस्थेपासून वयात येईपर्यंत कोणते अन्नघटक परिपूर्ण वाढीसाठी आवश्‍यक आहेत, याचे चांगले ज्ञान मला या पुस्तकांतून मिळाले. त्याचाही मी परिपूर्ण वापर माझ्या स्वयंपाकघरात करते.

जाता जाता मला एक सुचवावेसे वाटते- सध्या महिला कर्ती झालेली आहे. शिकलेली आहे. स्वतः काहीतरी वेगळे करावे, अशी युयुत्सु वृत्ती तिच्यात आहे. स्त्रीने प्रयत्नवादी असावेच; पण प्रयोगशीलही असावे. ही प्रयोगशीलता स्वयंपाकघरात दिसून यावी. स्वयंपाक हे केवळ मुलींचे वा स्त्रियांचेच क्षेत्र आहे, असे आता पूर्णत्वाने म्हणता येणार नाही. मुली अभ्यासात आणि करिअरमध्ये क्रांती करीत आहेत. म्हणून घरातील मुलांनाही स्वयंपाकघरातील मदतीचे शिक्षण द्यावे. त्यांनाही स्वयंसिद्ध करावे. यात कमीपणा नसून समंजसपणा आहे, हेही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

माझी आवडती डिश - मिक्‍स व्हेजिटेबल पराठा

साहित्य - एक कप गव्हाचे पीठ, एक कप बेसन, पाव कप ज्वारीचे पीठ, पाव कप तांदळाचे पीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, दोन चमचे तेल, एक उकडलेला बटाटा, एक गाजर किसलेले, अर्धी जुडी पालक (वाटून घेतलेली), लसणाच्या दोन पाकळ्या, एक चमचा ओवा, एक चमचा साखर, दोन चमचे लोणी, दोन चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ.

कृती - वरील सर्व पदार्थ पिठात नीट कालवून मळून घ्यावे आणि पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूला कमीत कमी तेल लावून शक्‍यतो वाफेवर शेकावे.

या पराठ्यात बहुतेक सर्व पदार्थांचा समावेश आहे. त्यात पौष्टिक घटकही पुरेपूर आहेत. शिवाय, मुलांना शाळेत टिफीनमध्ये देता येण्यासारखेही आहे. गृहिणींना ही डिश जरूर करावी. स्वतः चाखावी व मुलांनाही याची गोडी लावावी.
डॉ. निशिगंधा वाड

सौजन्य : ई-सकाळ

Sunday, July 5, 2009

Marathi Quotes




Friendship/Marathi












Friendship/Marathi










Friendship/Marathi









Friendship/Marathi









Friendship/Marathi










Friendship/Marathi









Friendship/Marathi









Friendship/Marathi







Friendship/Marathi











Friendship/Marathi











Friendship/Marathi










Friendship/Marathi








Friendship/Marathi









Friendship/Marathi








Friendship/Marathi










Friendship/Marathi








Friendship/Marathi









Friendship/Marathi



Funny Poem

१)

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कड बघ?
बाघ माझी आठवण येते का ??





2)

सॉफ्टवेर गारवा :

काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
भर दुपारी रिवीव् (review) होउन "डिजाईन " मनात साठत... !
तरी बोटे चालत रहातात .
डोके मात्र चालत नाही ...
बग ट्रैक मधे मेजोर Defects शिवाय काहीच दिसत नाही ..!!
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
रिलीज़ डेट दोन दिवसांनी Postpone करून जातो .. !!!
माउस उनाड मुला सारखा सैरावैरा पळत राहतो ...
CC, Forwards, Songs आणि Winamp मधे जाऊ पाहतो ..!!!!
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
डॉक्युमेंटेशन संपता संपता येउन ठेपते रिलीज़ ची वेळ .. !!!!
चक्क डोळ्यांसमोर सगला कोड अचानक चालू लागतो ....……………..
UAT मधे तरीही कुठून Defect येतो ....!!..!


३)

अभी अभी तो प्यार का PC किया
है चालुअपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालू
अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओऐ जानेमन
अपने दिल का Password तो बताओवो तो
हम है जो आप की चाहत दिल मॆं रखते हैवरना
आप जैसे कितने Softwares तो बाज़ार में बिकते हैरोज़
रात आप मेरे सपने में आते हो
मेरे प्यार को Mouse बना के उंगलियों पे नचाते हो
तेरे प्यार का Email मेरे दिल को लुभाता है
पर बीच में तेरे बाप का Virus आ जाता है
और करवाओगे हमसे कितना इंतजार
हमारे दिल की साईट पे कभी Enter तो मारो यारा
आपके कई नखरे अपने दिल पे बैंग हो गयेदो
PC जुड़ते जुड़ते Hang हो गएआप
जैसो के लिये दिल को Cut किया करते है
वरना बाकी केसेस में तो Copy Paste किया करते है
आप हँसना आप क चलना आप की वो स्टाईल
आपकी अदाओं की हमने Save कर ली है
Fileजो सदीयों से होता आया है
वो रीपीट कर दुंगातु ना मिली तो तुझे Ctrl+Alt+Delete कर दुंगालड़कीयां
सुन्दर हैं और लोनली हैंप्रोब्लम है कि बस वो Read Only हैं


) मला तुझी आठवन येते

आकाश काले झाले की ,
मला तुझी आठवण येते ।

ढग दाटून आले की ,
मला तुझी आठवण येते ।

जोरात पावूस आला की ,
मला तुझी आठवण येते ।

चिम्ब चिम्ब भिजल्यावर ,
मला तुझी आठवण येते ।





माझी छत्री मला परत कर ....!






Wednesday, July 1, 2009

माझं किचन: मंजूषा दातार-गोडसे


असंभव' आणि "राजा की आयेगी बारात' अशा मालिकांमधून सध्या घराघरात पोचलेल्या मंजूषा दातार-गोडसे स्वयंपाकही उत्तम करतात. किचनमध्ये स्वच्छता हवी आणि सगळ्या गोष्टींची आधी तयारी करून मग पटापट स्वयंपाक उरकायचा, कोणताही स्वयंपाक दीड तासात उरकतो, असं त्या सांगतात. त्यांचं हे स्वयंपाकाविषयीचं आणि किचनविषयीचं मनोगत.

लग्नाआधी मी घरात सर्वांत लहान असल्यानं स्वयंपाक करायची कधी वेळच आली नाही. आई कधी सांगायची नाही आणि ती नसेल, तेव्हा मोठी बहीण असायची. त्यांना कांदा चिरून दे, इतर काही कामं कर अशी लुडबूड करायचे; पण मोठी जबाबदारी कधी पडली नाही. लग्नानंतर मात्र मला बरंच टेन्शन आलं होतं. एक तर सासरी एकत्र कुटुंब होतं. त्यात मी माहेरची दातार आणि नंतर गोडसे. त्यामुळे कोकणस्थ आणि देशस्थ असा फरकही होता. पण अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं.

एक तर माझ्याकडे तीन रेसिपी बुक्‍स होती. माझी आई, ताई आणि तिसऱ्या स्वतः सासूबाई. त्यामुळे काही अडलं, की पटकन्‌ त्यांना विचारायचं आणि करून टाकायचं, असं सरळसोपं गणित होतं. शिवाय घरातले सगळेच खूप चांगल्या स्वभावाचे. कुणाचं पदार्थाला नावं ठेवणं नाही, की नखरे नाहीत. शिवाय दाद देण्याची पद्धत. मला आठवतं, की पहिल्यांदा केलेल्या पोळ्यांचंदेखील सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं. "किती छान झाल्यात, मऊ झाल्यात,' असं सगळ्यांनी म्हटलं होतं. खरं तर पोळ्यांसारख्या पोळ्या; पण त्यांच्याबद्दलही दाद मिळाली. अशा वातावरणामुळे मग आणखी हुरूप येतो.

आमच्या घरात गौरी-गणपती, नवरात्र, दिवाळी सगळं एकत्र असतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये मी शूटिंग किंवा नाटकाचे प्रयोग यांच्यामधून आवर्जून वेळ मोकळा ठेवते. या दिवसांत नैवेद्य, मोदक असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक असतो. तोही मी करते. बऱ्याचदा मुंबईला सलग दहा-बारा दिवस शूटिंग असतं. त्यामुळे तिथंही छोटं किचन आहे. मात्र, तिथं स्वयंपाकाला वेळ खूप कमी मिळत असल्यानं तिथं सगळा इन्स्टंट मामला असतो. खाण्याचा, करून घालण्याचा खरा आनंद अर्थातच पुण्यातच मिळतो. माझा पती अभय खूप चांगला स्वयंपाक करतो. मी नसताना मुलाला- रुद्रला डबाही बऱ्याचदा तोच करून देतो. त्यामुळे मी पुण्यात असते, तेव्हा त्यांना चांगलंचुंगलं करून खायला घालावं, त्यांना काही करायला लागू नये, हे मी आवर्जून बघते. रुद्र शाळेला सव्वासहाला जातो, अभयही ऑफिसला लवकर जातो. त्यामुळे पुण्यात साडेपाचलाच स्वयंपाक सुरू होतो. रुद्र दहा वर्षांचा आहे. तो आणि त्याचे बाबा यांचं खूप छान ट्यूनिंग आहे आणि दोघंही कधी अन्नाला नावं ठेवत नाहीत. कधी मीठ कमी-जास्त पडलं, तर बोलतसुद्धा नाहीत. सासूबाईही खूप छान स्वयंपाक करतात; पण त्याही प्रत्येक पदार्थाला दाद देतात.

स्वयंपाक करत असताना किचन स्वच्छ असलं पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. पुण्यात आले, की मी पहिल्यांदा अर्धा तास सगळं जागच्या जागी लावून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. किचन स्वच्छ असलं, की तुमचं मनही प्रसन्न होतं आणि त्यामुळे कामंही खूप लवकर आणि उत्साहानं उरकली जातात, असं मला वाटतं. माझा कुठलाही स्वयंपाक- अगदी पुरणाचा स्वयंपाकही दीड तासात उरकतो. "हिचं कधी होतं कळतही नाही,' असं सासूबाई म्हणतात. मला खूप वेळ किचनमध्ये घालवायला आवडत नाही. मात्र, तिथं जेवढा वेळ असते, तो योग्य रीतीनं, मनापासून वापरते. बाकी गोष्टींत जसं कॉन्संट्रेशन लागतं, तसं किचनमध्येही गरजेचं असतं. स्वयंपाक करताना कणीक भिजवून ठेवायची, भाज्या चिरायच्या, अशी सगळी तयारी आधी करून घेते. एक तर कणीक मुरल्यामुळे पोळ्या चांगल्या होतात आणि सगळी सिद्धता आधी झाल्यामुळे मग प्रत्यक्ष पदार्थ पटापट उरकतात. तुम्ही आता कुकर लावू, मग पोळ्या करू असं काम रेंगाळत ठेवलंत, की मग गोंधळ उडतो. बहुतेक वेळा सकाळी सातपर्यंत माझा स्वयंपाक उरकलेला असतो. बाई मदतीला असतील, तर काम आणखी पटापट होतं.

वेळ मिळेल, तेव्हा टीव्हीवरचे रेसिपी शोज मी बघते आणि जमेल तेव्हा करूनही बघते. अर्थात ठरवून वेगळेपणानं काही करत नाही, कारण आपल्याकडे मुळातच इतके वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत, की ते करून बघणं हेच खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. आतापर्यंत सुदैवानं माझा कुठलाच पदार्थ बिघडलेला नाही. माझ्या पदार्थांमधला पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या हे पदार्थ सगळ्यांना आवडतात. माझ्या दृष्टीनं आयडियल किचन म्हणाल, तर माझ्या ताईचं आहे. "मावशीचं घर म्हणजे हॉटेलच आहे ना, पाहिजे तो पदार्थ मिळतो,' असं माझा मुलगा म्हणतो. ती पाहिजे ते पदार्थ करून देते आणि स्वच्छता, टापटीपही तितकीच असते. माहेरकडून मिळालेली शिस्त, नीटनेटकेपणा आणि सासरची आपुलकी, अगत्य अशा चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य साधल्यानं माझं आयुष्य खूप छान, सुंदर बनलं आहे आणि स्वयंपाकामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटतं आहे.
मंजूषा दातार-गोडसे

सौजन्य : ई-सकाळ